Skip to main content

Posts

    पिंजलेला ढग आजही ढग कासावीस झाला कोसळून देखील पुन्हा तो कोसळायला आला तुझ्या अश्रुंचे प्रतिबिंब पाहून नदीही तुझी तिकडे रडली तुला सावरता सावरता आपलंच अस्तित्व ती हरवून बसली हिरवळ उधळणारा मेघराज नकळत आज वादळ बनतो केवढा भाग्यवान रे तू कमीतकमी  तुझे दुःख ,तू व्यक्त तरी करतो....                                            

असे मला वाटते

........असे मला वाटते.      वाटतं कधीतरी  अदृश्य मी व्हावे माझ्या इवल्याश्या दुनियेत  एकटीच मी राहावे उडणाऱ्या त्या पक्ष्यासारखे उंच मी उडावे उडता उडता त्या ढगांशी  खूप गप्पे मारावे त्या रडणाऱ्या पावसाला असेच मी पहावे मग त्याच्यांशी पैज लावून ढळा ढळा रडावे कोणाला कधीतरी डोळेभरून पाहावे मनातील काटे सगळे त्याच्या समोर तोडावे वाटलं कधी तर एकांतात मुखवटे काढावे मनातले वादळ कागदावर लिहून  जोरात  ते फाडावे पाण्यावरतील पान बनून  कुठेही दूर वाहावे लाजाळूचे झाड बनून  स्वतःला स्वतःच सावरावे पसरलेल्या मोत्यांना  ह्याच हातांनी आवरावे सूर्याच्या त्या किरणाला  आशेच्या मुठीत धरावे उजवाडाला पाहून  त्या काळोखाला विसरावे जीवनातील चक्रव्यूहात  फक्त तुलाच शोधावे  कधीतरी जीवनात किट्ट काळे पाषाण बनावे मग त्या वरती चढून मोठयाने ओरडवे मागे न वळता  पुढेच चालावे ढगफुटीचा पाऊस बनून धो धो कोसळवे मिठाप्रमाणे समुद्रारात  क्षणात विरघळावे वाटे मला हे सगळे मी ...

दोस्ती

                        **अपनी दोस्ती*** क्या कहू  मेरे लिए कौन हो तुम... अंँधेरे में जलने वाले दीपक हो तुम, हर दर्द का मेरे मरहम हो तुम मेरे हर खुशी का राज़ हो तुम।।१।।  मन के लबों पर तुम्हारे हँसी का सागर हो वसंत ऋतू के तुम  बहार हो।।२।। किसमे इतनी हिम्मत जो अपनी यारी तोड़ सके, इतनी मजबूत दोस्ती हैं जो समय के चक्र को भी मोड़ सके।।३।। रात में जब आँखे बंद हुई तब यादो की बारात तुमने लायी, फिर आंँखो में आँसू और लबों पर हँसी छायी।४।। बस इतना याद राखना पगलों... तुम्हारी चुप्पी मुझे रुलये सच कहू यारों... तुम्हारा प्यार और पागलपंती मुझको भाये।५।                                    

न सुचलेली कविता...

     न सुचलेली कविता... आज डोके का खाजवते? शब्दांच्या गर्दीत का असे हरवते? सुचत नाही आज एकही कविता.. काय  लिहू  माहीत नाही.. परंतु काही लिहिल्याशिवाय  मन रमतही नाही. मध्येच हे काय घडते! यमक जोडताना  मुक्तछंद का डोकावतो.. विचारांच्या पावसात  शब्दांची बीज उगवते पावसात पाणी व उन्हात सूर्य नसल्या सारखी दशा झाली, तरीही ही दशा  नव्याने कवितेचा सूर्य उगवते                                               

अनोळखा प्रवास

अनोळखा प्रवास बाहेर पडले कुठे तरी जायला म्हटले,"मी आज लवकर पोहचणार"! पहाटे बसमध्ये बसली हट्ट होता माझा "आज कशीही करून मी तिकडे जाणार". तशी नवीन नव्हती ती जागा परंतु रस्ता नवा होता, बसीचा तो आवाज कशाचा तरी संकेत देत होता. शेवटी ती ओळखीची जागा नजरेत पडली, म्हटलं बरं झालं ..आता मी पोहचत आली. थोड्या वेळात बघितलं तर सगळं दृश्यच बदललं, मला जिकडे जायचं होतं ते तर मागेच राहिलं. धीर दिलं मनाला  म्हटलं... "दुसऱ्या रस्त्याहून नेत असेल, एका ठिकाणी पोहचण्यासाठी अनेक वाटा असतात तसच ह्यांचा कुठला ठराविक वेगळा मार्ग असेल". नकळत आता शेवटी खरच मी दुसरीकडे पोहचली, अर्धा तास वाट पाहुन पुन्हा तिथून मागे यायला बस सुटली. जायचं होतं कुठे आणि कुठे मी पोहचली, अनोळख्या ह्या प्रवासात खंबीरपणे मी उभी राहिली. शेवटी जिथे पोहचायचे होते तिकडे सुखरूप मी पोहचली, मन तृप्त झालं पाहून की मी मुळीच नाही घाबरली.. एवढं होऊनही मी एवढंच म्हणणार....... जे काहीही माझ्याबरोबर घडले त्यातून मला काही नवे  अनुभव अनुभवायला मिळाले"...

मुलं व बाई...

....मुलं व  बाई... मुलांनी वर्गात खूप मस्ती केली, त्यांच्या आवाजाने बाई पूर्णपणे हादरून गेली. ओरडून ओरडून तिच्या आवाजाने पाऊल मागे घेतले , तरीही "मी माझे पाऊल मागे घेणार नाही", असे  तिच्या हृदयाने झटकन म्हटले. तिच्या प्रत्येक  प्रेमळ  प्रश्नांचे तिला कटूच उत्तर मिळाले, मुलांना न दुखवता कसं-बसं तिनं वर्गाला व स्वतः ला सांभाळले. तिही कदाचित बालपणीत अशीच करायची...  तिला याची जाणीव होती, मुलांमधील दोष न काढता ती शिक्षिका बनण्यासाठी स्वतःला सक्षम बनवत होती. हळूच करून घड्याळाचा काटा पुढे सरकला..... खोड्या करणारा तो ही तिला आदराने आता बाई म्हणू लागला, भूमी वरती ज्या वीजाबरोबर पाऊस कोसळत होता तोही आता जमिनीच्या कुशीत झरा बनून वाहू लागला. तिने दगडाला मोतीचे रूप देऊन  एक सुंदर लांब माळ केली, स्वतः  कुंभारीण बनून तिने मातीच्या गोळ्यापासून  एक सुंदर आकृती तयार केली

Your Smile..'तेरी हँसी

       तेरी हँसी          तेरी उस एक हँसी से मुझे दुनियाँ मिलती हैं। तेरे एक आँसू से मेरी आँखे दरियाँ बनती हैं।। तेरे यादो को मैने मोतियों का रूप दिया हैं। ऐसी डोरी जो कभी ना टूटे उनमे उसे पिरोया हैं।।             

Aaj punha

 आज पुन्हा.. ज्याच्या पासून दूर पळत होते पुन्हा आज तोच अंधार पसरला, तोच आता खडक बनून  माझ्या समोर उभा राहिला. रक्ताच्या अश्रूचा झरा  आज पुन्हा वाहू लागला, सुकून गेलेल्या अश्रूंनी दुःखाचा सागर पुन्हा भरून आला.

हे सगळे का घडले?

हे सगळे का घडले? कोणजाणे नेमके काय घडले..... खऱ्या जीवनात तिला  एक सुंदर स्वप्न पडले. हात कुणाचा मध्येच आला, जणू कोणी पडल्यावर आयुष्यात उठवतो तिला. ती उठली,ती सावरली  वाटले  तिला जणू मिळाला तारा, चातक पक्षीच बनून जणू  वाहू लागला तिचा वारा. इंद्रधनुष्य आले जीवनात होते धुके झाले नाहींसे , सगळीकडे आता फक्त  वाटू लागले हिरवे हिरवेसे. मध्येच असे काय घडले... रंग त्यांच्या जीवनात  होते जे कधी हिरवे हिरवे, त्यातच दूरवर पाहताच  वाटे का आज पुन्हा धुके धुके? डोळ्यातील पाणी  सुकून गेले कोण जाणे कुठे ते हरवले, त्याच्या घरी जाणाऱ्या वाटा कदाचित तिच्यावर रुसून बसले परंतु.......हे सगळे असे का घडले? One turning point came in her life.One person came in her life .He was like  a  beautiful dream in the real world .  He was a  wonderful part of her life.. All her problems disappearwd due to his arrival in her life.

कदाचित तुला माहित नसेल...

कदाचित तुला माहीत नसेल की अशीही एक व्यक्ती असेल जी फक्त तुझ्याचसाठी रडेल एवढेच नाही . . . . तर ती तुझ्यासाठीसुद्धा मरेल कदाचित तुला माहीत नसेल.... एक व्यक्ती अशीही असेल  जिचा जीव तुझ्यातच गुंतलेला असेल नकळत तुला, ती फक्त तुलाच पाहत असेल पण कदाचित तुला हे सगळं माहीत नसेल..... एक व्यक्ती अशीही असेल जिचा लोभ तुझी संपत्ती नसून फक्त तुझा प्रेमअसेल जी काळोखातही तुझ्या उजेडासाठी स्वतः जळेन... पण कदाचित तुला हे सगळं माहीत नसेल... एक व्यक्ती अशीही असेल जिचा सूर्य तुलाच पाहून उगवत  असेल जी तुला चंद्रातही पाहत असेल पण कदाचित तुला हे सगळं माहीत नसेल...  एक व्यक्ती अशीही असेल जिला सगळीकडे तूच दिसत असेल तुझ्या आठवणीने तिच्या डोळ्यात आसव्यांचा पूर येत असेल पण कदाचित तुला हे सगळं माहीत नसेल...                                                

एक आठवण

एक आठवण खरंच रे.... नेहमी प्रमाणे हा दिवसही  तुझ्याच आठवणीने निघून गेला, कोऱ्या कागदावर ही कविता लिहिताना   मध्येच आसव्यांचा पूर आला. डोळे मिटताच सकाळी तुझ्या आठवणी पळत आल्या, डोळे उघडताच रात्री नकळत कसा हा अंधार झाला. चालता चालता मी दामले रे पण नाही कधी मी थांबले रे, कारण...... त्या क्षितिजाकडेच आहे मला जायचे रे......    त्या क्षितिजाकडेच आहे मला जायचे रे......                                

जीवनातील रंग

कोण आला हा सैरभैर घेऊनी वर्षाव प्रेमाचा? विसरूनी गेलो रंगात ह्या आपण प्रहार दुःखचा. रंगाने मी बहरूनी गेले थिरकले मी त्या मोरापरी, स्तब्धलेले पंख पसरूनी  फुलले मी  त्याच्या  पंखापरी. हे रंग फक्त रंग नसून अश्रुंच्या स्वप्नातील आहे तो रंग , पाण्याने कदाचित पुसून जाईल तरीही नेहमी  राहील पापण्यांच्या मनासंग काळा,निळा,लाल,पिवळा वेगळे असले तरीही  ते रंगच आहे, रंग खऱ्या जीवनातदेखील रात्रीचे वा दिवसाचे आहे. असे वाटे जणू कोणाच्या तरी  आगमनाचे स्वागत करी, चहू दिशा नव्याने जन्मलेल्या लहानग्या तान्ह्यापरी. उध्वस्तलेले जीवन आता पुन्हा नव्याने जन्मले, रुसून बसलेले वैर आता  प्रेमाचे रंग घेऊनी  उभे राहिले. तुटलेली ती दोरी जाता जाता तो जोडूनी गेला, पसरलेल्या त्या मोत्याना देखील रंगाने आपल्या सावरून गेला. ठेऊन गेला भेटवस्तू रंगपंचमीच्या हा सण, हर्षाने व प्रेमाने आता बहरून गेले हे सगळ्यांचे अंगण. About poem:- I have written this poem on the occasion of 'Rangpanchami' This is not just a fest...

टँक्नोवुमन ( Technowomen)

श्वास गेला चूल फुंकून भरले त्या कौलारात पाणी, फुंकत फुंकत श्वास संपला हरवलेही घरातील राणी कठोर कोरडे हात झाले दुष्काळ पडला या हातावर, हाथ ही आता मारू लगले हेच कोरले आहे काय माझ्या माथ्यावर? प्रहार केले सुईंनी हातांवर रक्त प्रवाह झाला रे आता, दामले हे हात शिवूनी कोणी प्रकाश होऊन तरी एकडे या आता. क्षितिजावर दिसला सूर्य आता जवळच माझ्या तो आला, तंत्रज्ञान विठ्ठल बनून दारात माझ्या उभा राहिला. चांगले दिवस आता आले वाईट दिवस झोपून गेले, रडून संपून आता फक्त हास्य या ओठांवर राहिले Shiwing machine ची साथ मिळाली Washing machine ने वेळाला सावरले, एक बोटाच्या स्पर्शाने कपडे सगळे न्हाऊन आले सहन केले  खूप  शोषण हौसलेल्या  ह्या दैत्यांकडून, Social sites च्या साहाय्याने गर्वाची ही त्याची काठी टाकेन मी मोडून वाटलं तुला की आक्रोश हा कोंडून राहील माझ्या या ओठांतच? Blog , youtube ,app च्या साहाय्याने मांडणार मी साऱ्या ह्या जगातच हात-डोळे माझे रडत होते कांदा-भाजी चिरताना, Chopping machine ने कोरले हास्य या चेहऱ्यावर रडताना रगड़ा आता रुसुन बसला...

मी हरवले

             मी हरवले काही कळतच नाही नेमके काय चालतय मनातं............ कुणाच्या खांद्याचा आधार शोधू ह्रदयातील या चार भिंतीच्या अंधारात. प्रेमाची भाषा वेगळीच असते कधी कुणाला हसवत असते, कधी कुणाला रडवत असते तर कधी ओठांवर हास्य व डोळ्यात पाणी आणत असते. वळणावर भेटतात तुझ्या आठवणी समूहाबरोबरही चालताना आता, सुखद वेदना देऊन गेला कोण जाणी कसं पाहता पाहता. तळवे डांबरात भाजून  गेले निर्जीव आता झाले  हे पाय, नाजूक पद लोखंडी झाले कळेना मलाच मला झाले काय.... रस्त्यावर नाही ती फुले आता फक्त तिथे  काटेच आहे, तोडताना सुध्दा नाव ओठी आसव्याबरोबर तूच आहे. टकटक लावून बसली आता त्या उजेड देणाऱ्या चंद्राकडे, डोळ्यासमोर असूनही नाही तो आता माझ्याकडे. कैदी प्रमाणे झाले हे जीवन बाहेर कसं येऊ सांग ना रे मला? प्रेमाची चावी घेऊन ये जर आठवण कधी आली माझी तुला. खूप महिन्यानंतर जेव्हा मला तू पहिला आसवं जमली डोळ्यांच्या कौलारातं, खुप काही सांगायचे होते परंतु गुंतले नयन फक्त तुला पाहण्यातं. घाबरू नको............... माझं ...

सुखदवेदना..

           सुखदवेदना.........                        संध्याकाळ होताच                                        आठवण तुझी आली मला  ,                                      तुझा हसता चेहरा                                                 डोळ्यांसमोर उभा राहिला.                                               फुलले  माझे मन                          ...

शेवटचा श्वास

           शेवटचा श्वास आई तू कुठे आहेस गं? तुझ्या मांडीवरील झोप आता मला आठवते गं. आठवते तुला जेव्हा तू म्हणायची अंगाई... गोष्ट तुझी ऐकता ऐकता मध्येच मी झोपी जाई. झोपला नाही तर जगच तु डोक्यावर घेई, गोष्टी सांगून तू मला शुर वीरांच्या जगात नेई... आता मी झोपायला जातो  तुझ्या  अंगाईची खूप आठवण येते, पण आई ..... इथे आता बंदुकांची गोळी माझ्यासाठी अंगाई गाते. अश्रू का गं वाहते तू? ताईच्या लग्नासाठी ठेव साठवूनं, उरातून वाहतो अश्रूंची धारा तुझा प्रेम आठवूनं. अगं प्रिये ........... नको ...अशी  रडू नकोस फार अमूल्य आहे अश्रू माझ्यासाठी, बनुच शकलो नाही मी आमच्या संसाराची दुसरी काठी.. मी न पाहिलेल्या आमच्या तान्ह्याला त्याच्या  बापाचा  गोड गोड पापा दे, माझा विचार न करता  तू फक्त त्याला धीर दे. सांग त्या सळसळत्या रक्ताला आम्हा शुर वीरांची गाथा,   मातृभमीचे ऋण फेडायला टेकायचा आहे इकडेच त्याला माथा .

मी कोण?

 तुच.. अरे इकडे तिकडे काय बघतो?   अंधारात का  बसला आहे? काही जमत नाही  म्हणून का तू लपला आहे? वेड्या जरा लक्ष टाक  त्या चंद्राकडे, काळोखात ही  सगळ्यांचं लक्ष आहे  फक्त त्याच्याचकडे. पाहिलं? चंद्रातही भरपूर डाग आहे, म्हणून काय त्याने  उजेड देणं थांबवलं आहे? नाही ना ! मग तू का अंधारात बसुन रडतो ? कलेच्या दिव्याचा प्रकाश  सतत  सगळीकडे पसरत असतो.. तो कसा आहे ,ती कशी आहे याचा विचार तू नको  करू, तर मी कसा आहे?  यावर विचार करायला तू कर सुरू. स्वतःला तुच्छ तू  कधीच लेखू नको, उडणाऱ्या या मनाला  स्वतः त असं कोंडून तरी ठेवू नको! पिंजऱ्यात तडफडणाऱ्या पक्षिसारखं झालं तुझं मन , वाऱ्याच्या झोक्याबारोबर  निवांत जा तू पण.. मोठ मोठी वारूळ बनवणारी मुंगिच असते, सां ग बघू... ती काय इवली नसते? आता बस हं खूप झालं रडणं, डोळे पुसून घे  बघू आणि बघ काय असत जगणं. वादळाला ही न घाबरणारा तो पर्वत बन.. कधीही न विझणारी  अखंड ज्योत बन. कधी ही न तुटणारी  ती दोरी बन ,  दोर...

आकाश व नदी

 Hello friends ! I have come up with small  poem about true love of river...In this I have inserted my own painting to make it interesting and little unique...I hope you will surely like it .........  नदी म्हणाली...... वर्षानु वर्षे कोंडुनी राहले निर्दयी ह्या मातृभूमित, वाहुनी जावया आहे मजला केला मी निश्चय आत.        सांग  आकाश दादा या भूमिला  सागरावरील  प्रेम माझे,    अस्तित्व  नाही त्याचे विना माझ्या  ना अस्तित्व त्याच्या विना माझे. धैर्य मात्र धरुनी चाल आकाश म्हणाला तू हादरु नको, वाटे मधले पाषाण पाहुनी तू मात्र घबरू नको.  निसर्गातील सौंदर्य तुला  जाळ्यात त्याच्या फसवू शकतो,            खंबीरपणे थांब तू कोणतरी फक्त तुझीच वाट पाहतो. प्रेमाची ज्योत पेटवूनी ठेव आत्महत्येला प्रवृत्त करणारी भूमिच आहे, डोंगरावरून कोसळतानाही तिच भूमी तुला सांभाळणार आहे.                   तुझ्या स्वागत...

Maa

My journey of writing poems have been started when I was studying in class 7th. POEMS always encourages and  inspires me to put forward my views ,opinions, own thoughts and helps me to remain calm and positive in life.For me, POEMS are my best friends because I can share and express anything which is there deep in my heart.My poems r mostly in Marathi,Hindi and English languages....I hope you will surely enjoy my poems ..       So friends! This is my first poem of          life....                                माँ जब जब छाए निराशा के बादल तब तब की हैं तुने खुशियो की बारिश। जब जब सरपे रहा तेरा आँचल पूरी हुई हैं मेरे दिल की हर ख्वाहिश ।।१।। जब जब पलके हुईं मेरी नम तब तब आँखे तेरी भी तो भर आईं थी। अकेली राहों मे जब डर सा लगने लगा था तब साथ मे हर वक़्त मरे तेरी  ही तो परछाई थी।।२।। जिंदगी के सागर मे जब हौसले की नाव डगमगाई ...