अनोळखा प्रवास
बाहेर पडले कुठे तरी जायला
म्हटले,"मी आज लवकर पोहचणार"!
पहाटे बसमध्ये बसली हट्ट होता माझा
"आज कशीही करून मी तिकडे जाणार".
तशी नवीन नव्हती ती जागा परंतु रस्ता नवा होता,
बसीचा तो आवाज कशाचा तरी संकेत देत होता.
शेवटी ती ओळखीची जागा नजरेत पडली,
म्हटलं बरं झालं ..आता मी पोहचत आली.
थोड्या वेळात बघितलं तर सगळं दृश्यच बदललं,
मला जिकडे जायचं होतं ते तर मागेच राहिलं.
धीर दिलं मनाला म्हटलं...
"दुसऱ्या रस्त्याहून नेत असेल,
एका ठिकाणी पोहचण्यासाठी अनेक वाटा असतात
तसच ह्यांचा कुठला ठराविक वेगळा मार्ग असेल".
नकळत आता शेवटी खरच मी दुसरीकडे पोहचली,
अर्धा तास वाट पाहुन पुन्हा तिथून मागे यायला बस सुटली.
जायचं होतं कुठे आणि कुठे मी पोहचली,
अनोळख्या ह्या प्रवासात खंबीरपणे मी उभी राहिली.
शेवटी जिथे पोहचायचे होते तिकडे सुखरूप मी पोहचली,
मन तृप्त झालं पाहून की मी मुळीच नाही घाबरली..
एवढं होऊनही मी एवढंच म्हणणार.......
जे काहीही माझ्याबरोबर घडले
त्यातून मला काही नवे
अनुभव अनुभवायला मिळाले".
Comments
Post a Comment