Skip to main content

अनोळखा प्रवास




अनोळखा प्रवास

बाहेर पडले कुठे तरी जायला
म्हटले,"मी आज लवकर पोहचणार"!

पहाटे बसमध्ये बसली हट्ट होता माझा
"आज कशीही करून मी तिकडे जाणार".

तशी नवीन नव्हती ती जागा परंतु रस्ता नवा होता,
बसीचा तो आवाज कशाचा तरी संकेत देत होता.

शेवटी ती ओळखीची जागा नजरेत पडली,
म्हटलं बरं झालं ..आता मी पोहचत आली.

थोड्या वेळात बघितलं तर सगळं दृश्यच बदललं,
मला जिकडे जायचं होतं ते तर मागेच राहिलं.

धीर दिलं मनाला  म्हटलं...
"दुसऱ्या रस्त्याहून नेत असेल,
एका ठिकाणी पोहचण्यासाठी अनेक वाटा असतात
तसच ह्यांचा कुठला ठराविक वेगळा मार्ग असेल".

नकळत आता शेवटी खरच मी दुसरीकडे पोहचली,
अर्धा तास वाट पाहुन पुन्हा तिथून मागे यायला बस सुटली.

जायचं होतं कुठे आणि कुठे मी पोहचली,
अनोळख्या ह्या प्रवासात खंबीरपणे मी उभी राहिली.

शेवटी जिथे पोहचायचे होते तिकडे सुखरूप मी पोहचली,
मन तृप्त झालं पाहून की मी मुळीच नाही घाबरली..

एवढं होऊनही मी एवढंच म्हणणार.......
जे काहीही माझ्याबरोबर घडले
त्यातून मला काही नवे 
अनुभव अनुभवायला मिळाले".
   


Comments

Kavyamann

Maa

My journey of writing poems have been started when I was studying in class 7th. POEMS always encourages and  inspires me to put forward my views ,opinions, own thoughts and helps me to remain calm and positive in life.For me, POEMS are my best friends because I can share and express anything which is there deep in my heart.My poems r mostly in Marathi,Hindi and English languages....I hope you will surely enjoy my poems ..       So friends! This is my first poem of          life....                                माँ जब जब छाए निराशा के बादल तब तब की हैं तुने खुशियो की बारिश। जब जब सरपे रहा तेरा आँचल पूरी हुई हैं मेरे दिल की हर ख्वाहिश ।।१।। जब जब पलके हुईं मेरी नम तब तब आँखे तेरी भी तो भर आईं थी। अकेली राहों मे जब डर सा लगने लगा था तब साथ मे हर वक़्त मरे तेरी  ही तो परछाई थी।।२।। जिंदगी के सागर मे जब हौसले की नाव डगमगाई ...

आकाश व नदी

 Hello friends ! I have come up with small  poem about true love of river...In this I have inserted my own painting to make it interesting and little unique...I hope you will surely like it .........  नदी म्हणाली...... वर्षानु वर्षे कोंडुनी राहले निर्दयी ह्या मातृभूमित, वाहुनी जावया आहे मजला केला मी निश्चय आत.        सांग  आकाश दादा या भूमिला  सागरावरील  प्रेम माझे,    अस्तित्व  नाही त्याचे विना माझ्या  ना अस्तित्व त्याच्या विना माझे. धैर्य मात्र धरुनी चाल आकाश म्हणाला तू हादरु नको, वाटे मधले पाषाण पाहुनी तू मात्र घबरू नको.  निसर्गातील सौंदर्य तुला  जाळ्यात त्याच्या फसवू शकतो,            खंबीरपणे थांब तू कोणतरी फक्त तुझीच वाट पाहतो. प्रेमाची ज्योत पेटवूनी ठेव आत्महत्येला प्रवृत्त करणारी भूमिच आहे, डोंगरावरून कोसळतानाही तिच भूमी तुला सांभाळणार आहे.                   तुझ्या स्वागत...

मी कोण?

 तुच.. अरे इकडे तिकडे काय बघतो?   अंधारात का  बसला आहे? काही जमत नाही  म्हणून का तू लपला आहे? वेड्या जरा लक्ष टाक  त्या चंद्राकडे, काळोखात ही  सगळ्यांचं लक्ष आहे  फक्त त्याच्याचकडे. पाहिलं? चंद्रातही भरपूर डाग आहे, म्हणून काय त्याने  उजेड देणं थांबवलं आहे? नाही ना ! मग तू का अंधारात बसुन रडतो ? कलेच्या दिव्याचा प्रकाश  सतत  सगळीकडे पसरत असतो.. तो कसा आहे ,ती कशी आहे याचा विचार तू नको  करू, तर मी कसा आहे?  यावर विचार करायला तू कर सुरू. स्वतःला तुच्छ तू  कधीच लेखू नको, उडणाऱ्या या मनाला  स्वतः त असं कोंडून तरी ठेवू नको! पिंजऱ्यात तडफडणाऱ्या पक्षिसारखं झालं तुझं मन , वाऱ्याच्या झोक्याबारोबर  निवांत जा तू पण.. मोठ मोठी वारूळ बनवणारी मुंगिच असते, सां ग बघू... ती काय इवली नसते? आता बस हं खूप झालं रडणं, डोळे पुसून घे  बघू आणि बघ काय असत जगणं. वादळाला ही न घाबरणारा तो पर्वत बन.. कधीही न विझणारी  अखंड ज्योत बन. कधी ही न तुटणारी  ती दोरी बन ,  दोर...